काही लिहायच्या आधी मी स्पष्ट करू इच्छितो की माझी साडेसाती संपलेली नाही अजून शेवटचे गोचर भ्रमण सुरू आहे...
साडेसाती म्हटलं की बऱ्याच नव्हे तर जवळ जवळ सर्वांनाच भीती वाटते. साडेसाती सुरू झाली आता काय होईल? खूप त्रास होईल का? मरणयातना असा ही काही जणांचा समज होतो. अगदी नको नको झाल्यासारखे जीव होतात लोकांचे...
2 नोव्हेंबर 2014 ला शनी महाराजांनी वृश्चिकेत प्रवेश केला त्या दिवसापासून माझी साडेसाती सुरू झाली खरेतर ही आयुष्यातील दुसरी साडेसाती मात्र त्यावेळी वय कळतं नव्हतं आणि त्यामुळे तो अनुभव गाठीशी नव्हता खऱ्या अर्थाने हाच पहिला अनुभव.....
ज्यादिवशी साडेसाती सुरू झाली त्यावेळी मला रवी महादशा(2,9,10,11)
शनी अंतर्दशा(2,3,4,7,12)
मंगळ प्रत्यंतर दशा(1,2,6,11)
अशी दशा होती म्हणजे खरतर काळजी करण्यासारखे काहीच नव्हतं कारण प्रत्यंतर दशा 2,10,11 सारखे अर्थार्जनाच्या दृष्टीने शुभ स्थाने ऍक्टिव्ह होती...
पुढे बुधाची अंतर्दशा(8,10,11) अशी अंतर्दशा होती आणि रवी प्रत्यंतर(2,9,10,11) दशेत मी घराजवळच्याच शाळेत 15 जून 2015 ला सहायक शिक्षक म्हणून रुजू झालो.
Sequence लक्षात घ्या...
महादशा आणि प्रत्यंतर दशा 2,9,11 अशी संयुक्त अक्टीव्ह करत असताना नवम भाव शिक्षणशी संबंधित क्षेत्रात कार्यरत झालो दशमात स्थिर राशी मला आजवर त्याच ठिकाणी स्थिर ठेवत आहे...
आतापर्यंत मला साडेसाती ची काहीच विशेष गोष्ट जाणवत नव्हती...
उलटपक्षी मी मार्च 2016 मध्ये दहावी साठी ssc बोर्डच्या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.....
नोकरी सुरू होतीच शिवाय माझी ज्योतिष विषयात आवड निर्माण झाली... टीव्हीवरच्या कार्यक्रम बघून प्राथमिक तयारी झालेला मी.. मला फॉर्मल शिक्षण घ्यावेसे वाटलं
परत sequence तोच
रवी/केतु/केतु
इथे 9 , 8 अशी स्थाने ऍक्टिव्ह होती जी ज्योतिष सारख्या गुढशास्त्राच्या अभ्यासासाठी पूरक आहेत...
सगळं उत्तम सुरू होतं अगदी मे 2017 मध्ये रवी महादशा संपेपर्यंत... चंद्राची महादशा(2,9) मे 2017 मध्ये सुरू झाली. लक्षात घ्या 9वे स्थान परत धर्म त्रिकोणाचे स्थान आहे... काही गोष्टी वेळेत झाल्यास त्याचा आनंद असतो..
दरम्यान 26 जानेवारी 2017 रोजी शनी महाराज प्रत्यक्ष राशीतच आले... साडेसातीचा एक चांगला अनुभव मी ऐकून होतो की साडेसातीत जुन्या रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतात.. त्याचा मात्र अनुभव घेतला...
चंद्र महादशा(2,9)
चंद्र अंतर्दशा(2,9)
आणि मंगल प्रत्यंतर दशा(1,2,6,9,11) लक्षात घ्या महादशा, अंतर्दशा, आणि मुख्य प्रत्यंतर दशेत 1,9 ही धर्म त्रिकोणाची स्थाने आणि जोडीला 11 हे इच्छापूर्तीचे स्थान ऍक्टिव्ह झालं तेव्हा वयाच्या 28 व्या वर्षी 30 मे 2017 ला माझी मुंज झाली... इथे महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा तिन्ही स्तरावर योग्य ती स्थाने ऍक्टिव्ह व्हायला हवीत हे अधोरेखित झाले...
मी अजूनही साडेसाती चा वाईट असा अनुभव घेतला नव्हता...
महादशा 2 ची आहे 2 मारक स्थान आहे जोडीला 9 स्थान स्थिर लग्नाला बाधक आहे... म्हणून
चंद्र महादशा(2,9)
चंद्र अंतर्दशा(2,9)
गुरू प्रत्यंतर दशा(2,3,5,8)
शनी सूक्ष्म दशा(2,3,4,7,12) च्या चार दिवसांच्या काळात फक्त हॉस्पिटल चा पाहुणचार घेतला... इथे सुद्धा sequence महत्त्वाचा आहे.
दरम्यानच्या काळात करियर स्थिर झालं होतं . 2 स्थान ऍक्टिव्ह असल्याने उत्पन्न ही सुरू होतं.....आहे...
पुढे मंगळ अंतर्दशेत (1,2,6,9,11) याकाळात ही अर्थार्जन सुरूच राहील increament चांगलं झालं...
राहुची अंतर्दशा(1,3,6,11) सुरू झाली 2 ने साथ सोडली आणि annual increament ला पहिला खो लागला...😢😢
अजून राहू अंतर्दशा सुरूच आहे... पुढे गुरू, शनी, बुध, केतु, शुक्र रवी प्रत्येक जण 2 स्थान ऍक्टिव्ह ठेवतोय तो नोकरी टिकविण्यास आणि अर्थार्जन सुरू ठेवण्यास पूरक आहे...
बाकी single ला 2 चा आधार😂😂😂
एकूण पाहता गेल्या पाच वर्षातील शनी भ्रमणात 2,6,10,11 या स्थानांनी मला आधार दिला ते पुढेही देत राहणार आहे...
फक्त ते चार दिवसांचा हॉस्पिटल चा पाहुणचार सोडल्यास बाकी ok...
मूळ कुंडलीतील शनिवर गुरुची पूर्ण दृष्टी मनाला दिलासा देते😇😇😇
सारांश एकच: जर दशा अनुकूल असतील आणि विशेषतः 8,12 ऍक्टिव्ह होत नसतील तर शांत पणे साडेसाती चा आनंद घ्या. तो आपल्या चित्त मन शुद्धीचा काळ आहे🙏🙏