#विभंग (अभंगाचे विडंबन)
मूळ अभंग: समर्थ रामदास...
आरंभी धरीन अयोध्येच्या वाटा ।
सध्याचिया काळा गरज असे ।।१।।
पावेल का राम? "राज"संकट काळी।
रामनाम "राजा" उच्चरित ।।२।।
उच्चारितां राम होय साफ भूत (काळ) ।
"राजा"चा निश्चय रामभूमी ।।३।।
रामभूमी "राज"कारण्यासी आठवे ।
"राज"धर्म नाठवें काही केल्या ।।४।।
काही केल्या मनसे मत का मिळेना?।
हर्षा म्हणे मतदार व्हा चाणाक्ष ।।५।।
- हर्षद मोहन चाफळकर ,
१००५२०२२२३४२
No comments:
Post a Comment