Thursday, April 23, 2020

मल्ल्याची अटक

आधी सध्याचे गोचर तपासू

मल्ल्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे.

गुरू जून नंतर बारावा होईल.

लग्न कुंडलीत शनी 12 व्या स्थानातून गुरू नोव्हेम्बर नंतर 12 व्या स्थानातून, राहू सप्टेंबर नंतर चतुर्थातून, आणि केतु मूळ राहु शनी वरून जाणार आहे म्हणजेच *सप्टेंबर2020 पासून मार्च 2022 पर्यंत चा काळ मल्ल्यासाठी खडतर असणारच आहे*

आता दशा,अंतर्दशा, विदशा तपासू(डर्टी डेटा च्या सहाय्याने)

सध्या शनी ची महादशा
शनी
1,9,12
अंतर्दशा
गुरू ची
गुरू 2,6,11 चा कार्येश आहे म्हणजे किमान ही शनी/ गुरू अंतर्दशा संपेपर्यंत त्याला अटक होताना दिसत नाही.

नंतर येणारी बुधाची महादशा
बुध 5,8,10
शनी 1,9,12

मल्ल्याला 
बुध/ बुध/ बुध म्हणजेच *मार्च 2022 ते जुलै 2022* या काळात  भारतात अटक होण्याची शक्यता आहे.

हा माझा अंदाज आहे.

- हर्षद मोहन चाफळकर,
पुणे-१४

Monday, April 13, 2020

मेष संक्रमण 2020

🌼 *।।श्रीगुरुदेव दत्त।।*🌼
सदर कुंडली ही 13 एप्रिल 2020
रात्री 8 वाजून 23 मिनिटांची 
नवी दिल्ली ची असतल्याने याचे परिणाम फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात जाणवतील..
👉 *प्रमुख ग्रहयोग* 👈

❌ षडअष्टक ❌
शनी-राहू
गुरू-राहू
प्लूटो-राहू
मंगळ-राहू

❌केंद्र योग❌
शनी- रवी
मंगळ- रवी
प्लूटो- रवी
गुरू- रवी

❌युती❌
रवी-हर्षल
गुरू-मंगळ-शनी-प्लूटो
✅नवपंचम✅
रवी-केतु
राहू- नेपच्यून

💠मेष संक्रमण ची कुंडली तूळ लग्नाची आहे लग्नेश शुक्र स्वराशीत अष्टमात असल्याने सध्या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे हे अधोरेखित होतंय. सामान्य जनतेच्या कारक चंद्र याच्याशी लग्नेश शुक्राचा षडअष्टक सरळ सरळ दाखवतोय की जीवनशैलीशी निगडित आजार (डायबेटीस, हृदयरोग)ज्यांना आहेत ते या संसर्गातून बाधित होत आहेत, होणार आहेत.
💠 द्वितीयेश मंगळ चतुर्थात षष्ठेश गुरू चतुर्थेश,पंचमेश शनी प्लूटो यांच्या युतीत असल्याने सरकारी तिजोरी बँका यांचा सगळा निधी पुढच्या तीन महिन्यात आरोग्य आणि शेती उद्योग याना उभारी देण्यात जाणार आहे.(कालचीच बातमी आहे बँका लोकांना कर्ज देतायत.)💠 तृतीय स्थानात चंद्र केतु युती चंद्र दशमेश होऊन तृतीयात, सत्तारूढ पक्षाकडून दळण वळण, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
💠चतुर्थ स्थानात मकर राशीत मंगळ, गुरू, प्लूटो, शनी हे चार ग्रह आहेत त्यांचा राहू शी षडअष्टक योग होत आहे. या काळात हवामानात विचित्र बदल संभवतात. भूकंप  चक्रीवादळाची शक्यता आहे.शिवाय संसर्गाच्या कचाट्यात वृद्ध व्यक्ती, जुने आजार असणारे व्यक्ती, स्थूलपणा  असणाऱ्या व्यक्ती, धार्मिक स्थळे, धार्मिक कार्यक्रमासाठी लोकांचे एकत्र येण्याने संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
💠पंचमात कुंभेचा नेपच्यून शेअर बाजारात *फसवी वाढ*  दाखवेल. पंचमेश शनी स्वतःच्या व्यायात असल्याने शेअर बाजार सुधारण्याची शक्यता किमान जुलै पर्यंत शक्यता दिसत नाही. जन्म मृत्यू नोंदणीत अफरातफर किंवा खोटे आकडे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
💠 षष्ठ स्थानात नीच राशीत बुध व्ययेश होऊन सध्याच्या रोगावर हॉस्पिटलायझेशन चे प्रमाण वाढण्याचे प्रमाण अधोरेखित करतो. इथून पुढे तीन महिन्यात *"कदाचित"* लहान मुले वय वर्ष 0 ते 12 या वयोगटातील मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक वाटते.
💠 सप्तम स्थानात उच्चीचा रवी लाभेश होऊन परदेशात देशाचा लौकिक वाढेल. मित्र राष्ट्र आंतरराष्ट्रीय संघटनेकडून आर्थिक मदत, मिळेल.
💠अष्टम स्थानात स्वराशीचा शुक्र स्त्रिया, कलाकार, याना तापदायक,सोने-चांदी मौलयवान वस्तू यांच्या किमतीत वाढ शक्य आहे.
💠 भाग्यातील राहू  भाग्येश षष्ठात कारणाने तीर्थक्षेत्रे, धर्मपीठ, कोर्ट येथील अपहार बाहेर येऊ शकतो  न्यायाधीश, धर्मगुरू वादाच्या केंद्र स्थानी असू शकतील.

15 जुलै ते 14 ऑगस्ट 2020 हा काळ केंद्र सरकार साठी तापदायक ठरू शकतो.

वरील सर्व भाकिते ही माझ्या अभ्याससाठी आहेत. ही भाकिते पुढील वर्षभरासाठी आहेत मात्र  14 जुलै 2020 पर्यँत याची फळे तीव्रतेने जाणवतील. कर्ता करविता श्री गुरुदेव दत्त


- ✒️ _हर्षद मोहन चाफळकर_
_ज्योतिष विशारद, पुणे-१४_
🙏 *_।।श्रीदत्तात्रर्पणमस्तू।।_*🙏

आत्मा आणि देहदान


आजचे दोन्ही विषय विचारात घेता पहिल्या विषयावर दुसरा विषय अवलंबून आहे...

मुळातच आत्मा म्हणजे काय? या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल.

भगवान श्रीकृष्णाने गीतेत स्पष्ट पणे आत्म्याची व्याख्या एका लोकप्रिय श्लोकातून केली आहे...

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।

अर्थ: ज्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्निद्वारे जाळता येत नाही,पाण्याने भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने सुकवता ही येत नाही त्याला आत्मा म्हणावे....

आता इतकी व्यापक व्याख्या स्वतः भगवान श्रीकृष्णाने केली आसतना पुन्हा नव्याने ती करण्यात अर्थ नाही...

श्रीकृष्णाने आत्मा कुठल्याच प्रकारे संपवता येत नाही हे सांगितले याचाच अर्थ आपली भारतीय संस्कृतीत जे सांगितले आहे की मनुष्य जन्म हा ८४लक्ष योनी फिरून आल्यावर प्राप्त होतो...

त्या ८४ लक्ष योनी सुद्धा मी थोड्या शोधल्या त्या मला खालील प्रमाणे मिळाल्या...

जलचर - ९ लक्ष

पक्षी - १० लक्ष

कीटक - ११ लक्ष

वनस्पती - २० लक्ष

पशु - ३० लक्ष

मानव - ४ लक्ष

असे एकूण ८४ लक्ष होतात.

आता आपण सहज म्हणू शकतो की एवढे जीव खरच पृथ्वी तलावर आहेत का?

त्याच उत्तर कदाचित डिस्कव्हरी, animal planet, किंवा तत्सम निसर्गाला वाहून घेतलेल्या वाहिन्यावरचे माहितीपट पाहिल्यावर जीवसृष्टीत ले वैविध्य लक्षात येईल व आपली ८४ लक्ष  योनी आहेत हे ही लक्षात येईल....
यातल्या कित्येक योनीचं जीवनकाल हा काही तासापासून कासवासारखे प्राणी ४०० वर्ष जगतात(कोलकात्यात एक आहे.)

एवढा अवाढव्य सृष्टीचा विस्तार  असताना त्यात कित्येक आत्मे फिरत राहतात...


आपल्या वेद उपनिषदांचा एक भाग असलेल्या ज्योतिष शास्त्रात सुद्धा एखाद्या व्यक्तीची पत्रिका करताना त्या पुस्तिकेत पहिले वाक्य हेच लिहलेले असते
"अस्य बालकस्य पूर्वकर्मानुसारेण"

याचाच अर्थ आपली संस्कृती ही पूर्वजन्म मानते आणि गेल्या जन्मीचे भोग संपवण्यासाठी मनुष्य अथवा कोणत्याही योनीत जन्म घेऊन ते भोग पूर्ण करते....

साधी गोष्ट आहे, आजच्या आधुनिक जगतात जिथं सगळ्या सुख सुविधा सहज उपलब्ध आहेत अश्या काळात ही कित्येक लोक उपाशी मरतात, त्यांना समाजात प्रतिष्ठा नसते....
जन्माने कोणी श्रीमंत,गरीब, लहान, मोठा जन्माला येत नाही. पुरुष किंवा स्त्री कोणीही असो आपल्या कर्माने आपले भाग्य ठरवते. आणि सतकर्म करण्यासाठी मनुष्यासारखा प्रगत कुठला देह नाही, योनी नाही

आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे... तरीही स्त्रीवर्गाचा काही भाग वेश्याव्यवसायात आहे... का? त्यांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या? उन्नतीचे मार्ग उपलब्ध नव्हते? पण या स्त्रियांचे हे गतजन्मीचे भोग आहेत जे ते मनुष्य योनी ला येऊन भोगत आहेत....

याचाच अर्थ आत्मा हा वासना एका देह कडून दुसऱ्या देहाकडे एका योनीतुन दुसऱ्या योनीत घेऊन जात असतो. आत्मा नश्वर आहे. याच एक उदाहरण महर्षी वाल्मिकी यांचं देता येईल....

आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत तो वाल्या कोळीच होता... रोज जाऊन शिकार करायचा हत्या, खून करायचा....

त्याला का नारदमुनी भेटावेत आणि वाल्याचा वाल्मिकी व्हावा जो पुढे जाऊन आदर्श जीवनपद्धती चे मानदंड ठरणारे *रामायण* लिहून अमरत्वाला प्राप्त झाला...
हा प्रत्येकाचा गेल्या जन्मीचे भोग असतात ते भोग संपले की मग तुमचे या जन्मीचे कर्म कारणी लागतात आत्मा पवित्र तेव्हाच असेल जेव्हा तुमची कर्म स्वच्छ असतील...

आणि

असा पवित्र आत्माच पुढच्या जन्मी चांगल्या योनीत जन्म देऊन या जन्मीच्या सत्कर्माची फळे देईल....

एकदा आत्मा नश्वर आहे हे मान्य केले की देह समजायला फार सोपा जातो...

आपले पूर्वजन्मीचे भोग भोगण्याचे माध्यम आणि या जन्मी काही सत्कर्म करण्याचे साधन म्हणून देहाकडे पाहिले पाहिजे....

देह साधन(tool)आहे साध्य(goal) नाही. हे एकदा मनाशी ठाम ठरवलं की मग देहदान वगैरे संकल्पना पचवायला सोप्या जातात...

आपले या जन्मीचे कार्य संपले की आनंदाने तृप्त मनाने देह ठेवावा....
देहदान हे पुण्यदान म्हणून समाजात बिंबवले पाहिजे...

तुमच्या देहाची त्यातील उपयोगी अवयवाचा उपयोग कोण्या गरजवंताला होईल...

त्या देहाचा उपयोग नवीन शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थांना होईल...


जोपर्यंत तुम्ही वासनेत अडकून राहाल तोवर तुम्ही या ८४ लक्ष योनी आणि आत्मा देह याच्या फेऱ्यातून सुटणार नाही....

धन्यवाद!!!

- हर्षद मोहन चाफळकर,
पुणे-१४

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला