Sunday, December 31, 2023

आठवणी साडेसाती च्या...

🙏सुप्रभात मित्रांनो🙏

वर्षाच्या शेवटच्या दिवशी हे लिहितोय🙏🙏

मी जवळ जवळ 70-80 ज्योतिष विषयक फेसबुक ग्रुप मध्ये आहे. आणि सध्या कुठल्याही अभ्यासपूर्ण पोस्ट मध्ये धनू, मकर,कुंभ राशीचा उल्लेख झाला असल्यास त्या राशीचे जातक एकच प्रश्न विचारतात 

"आमची साडेसाती कधी संपणार?"

सगळ्यात पहिली गोष्ट शनी महाराज काही कंत्राटी कामगार नाहीत की मनाला वाटलं बोलावून घेतलं, मनाला आलं काढुन टाकलं!!
शनी महाराज स्वतःच्या गतीने चालतील त्यांना कोणीही अगदी कोणीही अडवू शकत नाही कारण शनी महाराज कर्माचे दैवत आहे.🙏
जो कर्म करेल त्याचीच वाहवा होईल!!! इतका साधा नियम शनी महाराजांचा आहे.

आता मूळ पोस्ट मधील प्रश्नाचे उत्तर

भूतलावरील आणि किमान फेसबुक वरील समस्त धनू जातकांनो आपण बारावा शनी हसत खेळत सहन केला पहिला शनी तो ही सहन केला आता दुसऱ्या शनी ने असे कोणते मोठे आभाळ कोसळवले आहे की तुम्ही शनी महाराजांच्या नावाने शंख करत आहात?

धनू वाल्यांना मुक्त उधळायची सवय आहे. पण धनू वाले उधळता उधळता कधी कधी भरकटतात त्याच भरकटणाऱ्या घोड्याला लगाम लावून शनी महाराज पुन्हा ट्रॅक वर आणत आहेत!!! गेल्या 6 वर्षात आणि येत्या 2 वर्षात त्यावर थोडा लगाम लागलाय तो आपल्या भल्यासाठीच आहे,,, 
धनु वाल्यांना काही गोष्टी सहज साध्य होतात कारण ती भाग्यवान राशी आहे सध्या लागलेला लगाम आपलं हितचिंतकच आहे!!!

साडेसाती हे गेल्या तीस वर्षातील आपल्या कर्माचं ऑडिट आहे एवढं मनावर बिंबवा कारण तेच सत्य आहे, शाश्वत आहे!!!!

गेल्या तीस वर्षात आपल्या हातून कुठली दुष्कृत्य झाली असतील निर्णय चुकले असतील तर त्याची चौकशी, मीमांसा शनी महाराज या आठ वर्षात(साडेसात नव्हे!!) करत असतात. त्यांची चौकशी ही ED पेक्षाही भयंकर असते आणि तिथं तुमच्याच चुकलेल्या कर्माची CD शनी महाराज लावत असतात!!! म्हणून साडेसातीचा काळ हा आत्मचिंतनाचा आहे आणि सत्कर्म करण्याचा आहे!!!!

धनू जातकांच्या ज्यांच्या दशा / अंतर्दशा 1,3,8,12 च्या आहेत त्यांनी स्वतःच्या तब्येतीची आणि आर्थिक गणिताची परिपूर्ण काळजी घ्यावी!!

आणि कुठंतरी मनावर कोरून ठेवा
"ये दिन भी जाएंगे"

मकर जातकांनो जर तुमच्या दशा 3,8,12 च्या असतील आणि पुढच्या किमान  दोन वर्षात जर तुम्हला विरक्तीचे डोहाळे लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!! असा काळ येतो,,, मेष ते धनू वाले यातून गेलेले आहेत!!!

वरती पोस्ट मध्ये 8,12 च्या दशा चा उल्लेख झालाय याचा अर्थ 2,4,5,6,7,9,11 वाल्यांनी रोज दिवाळी साजरी करावी असा होत नाही त्यांनी एकच करावे कायद्यात रहा फायद्यात राहा!!

कुंभ जातकांनो "अभी तो पार्टी शुरू हुई है।"

तूर्तास लेखनसीमा!!!!

✍️ हर्षद मोहन चाफळकर, पुणे
३११२२०२००८३७

पोस्ट नावसहित शेअर करावी अन्यथा शनी महाराज त्वरित दंड करतात!!

Monday, December 25, 2023

ज्योतिष समूहावरचे बर्थ टाईम रेक्टीफिकेशन अर्थात जन्मवेळ शुद्धीकरण...

आजचीच म्हणजे 25 डिसेंबर 2023 ची गोष्ट आहे.
एका ज्योतिष समूहावर BTR करण्यासाठी एका ज्योतिर्विदाना मदत लागत होती..बऱ्याच दिवसांनी हात साफ होणार म्हणून मी संधी साधली...
कुंडली चे डिटेल्स खालीलप्रमाणाने..

स्त्री
23 डिसेंम्बर 2008
जन्मवेळ 16: 20 ते 16: 30 च्या दरम्यान..
मुंबई..

म्हटलं काढा आपली अस्त्र..
प्रश्न कुंडली मांडून आताचे LSRD घेतले

25/12/2023
19.27.28
पुणे
L: बुध
LS: गुरू
S: चंद्र
R: शुक्र
D: चंद्र

मग म्हटलं दिलेल्या मर्यादेच्या लग्नाचे रुलिंग प्लॅनेट पाहू..

16:20 शुक्र । चंद्र । राहू । शुक्र
16: 30 शुक्र । चंद्र । शनी । शनी

म्हटलं LSRD मध्ये चंद्र आणि शुक्र आहे आणि दिलेल्या वेळ मर्यादेत शुक्राचे लग्न आणि चंद्राचे नक्षत्र होते म्हटल्यावर दहा मिनीटातली योग्य वेळ नक्की काढता येईल..

LSRD वर नजर फिरवली..
गुरू LS होऊन जास्त बलवान होता शिवाय दहा मिनिटात राहू आणि शनी च्या सब मध्ये गुरू चा सब आहे...

म्हणजे गुरू हा सब घेता येईल शिवाय राहिलेला बुध सब सब घेता येईल..

झाली लग्नाचे रुलिंग प्लॅनेट फिक्स केले 

शुक्र । चंद्र । शनी । बुध

ती वेळ आली 16: 24 

नुसती वेळ येऊन काय उपयोग जुळली पण पाहिजे ना..

आधीच्या गुरुजींची जुळत नव्हती म्हणून तर समूहावर मदत मागितली...

शांत पणे पाहिल्यावर लक्षात आले 

अरे!!! लग्नाचा सब गुरू हा चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे..

संपला ना विषय..

ए धडत ततंग धडत ततंग...

Monday, November 6, 2023

विधानसभा २०१९

#विंदा_करंदीकर

#विधानसभा2019

जितकी डोकी तितकी मते 
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल 
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; 
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा 
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग 
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? 
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे 
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के 
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी 
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) 
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; 
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; 
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; 
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा 
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; 
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; 
सब घोडे बारा टक्के!

Wednesday, November 1, 2023

WPL: भारतीय महिला क्रिकेट चे भविष्य

क्रिकेट.. तसा बऱ्यापैकी राष्ट्रकुल देशांमध्ये पसरलेला आणि विशेष करून भारतीय उपखंडात धर्म म्हणून ओळखला जाणारा खेळ... ही लोकप्रियता या उपखंडात ल्या विक्रमवीर खेळाडूंमुळे आली असं म्हणता येईल.. पण  "जेटलमन्स गेम" म्हणून ओळखला जाणारं क्रिकेट जर महिला खेळायला लागल्या तर???
आज याच महिला क्रिकेटची आणि महिला क्रिकेट मधील लेटेस्ट अट्रॅक्शन ठरलेल्या WPL विषयी आपण चर्चा करणार आहोत...
तत्पूर्वी  भारतातल्या महिला क्रिकेट चा थोडा मागोवा घेऊ या म्हणजे मग आपल्याला WPL चे महत्त्व कळेल..
सूरुवात: भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ जसा १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळतोय अगदी त्याच वेळेपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे महिला क्रिकेट खेळत आले आहेत.. पण भारत पहिला महिला कसोटी खेळायला १९७६ साल उजडावं लागलं.. तो पहिला महिला कसोटी सामना झाला भारतीय महिला आणि वेस्ट इंडिज च्या महिला संघ यांच्या मध्ये.. १९७६ पासून आजवर फक्त ३८ कसोटी सामने भारतीय महिला संघ खेळला.. या सगळ्या गोष्टींना थोडी संघटनात्मक बांधणी मिळावी म्हणून पुण्यात १९७३ साली वुमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया (WCAI) ची स्थापना झाली आणि प्रेमलाकाकी चव्हाण (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई) पहिल्या अध्यक्ष झाल्या.. तेव्हा पासून २००६/०७ पर्यंत हीच WCAI भारतीय महिला क्रिकेट ची धुरा वाहत होती २००६/०७ मध्ये WCAI चे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI) मध्ये विलीनीकरण झाले..
विष्वचषकातील कामगिरी: आजवर भारतीय महिला संघ १९७५ चा विश्वचषक वगळता सर्व विश्वचषकात सहभागी झाला २००५ व २०१७ मध्ये उपविजेता ठरला..
यावेळी अनेक महिला क्रिकेटपटूंनी नावलौकिक मिळवला लोकप्रियतेच्या बाबतीत डायना एडलजी, शुभांगी कुलकर्णी, शांता रंगस्वामी, अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी, आजच्या काळातल्या हरमनप्रित कौर, जेमीमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्मृती मांधना इत्यादी गाजल्या...
नियमित सामने: BCCI मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट केंद्रस्थानी येऊ लागला दरवर्षी महिला क्रिकेटपटूना वार्षिक काँट्रॅक्टस मिळून नियमित निश्चित उत्पन्न आणि आर्थिक प्रश्न मार्गी लागले. महिला क्रिकेट अधिक व्यावसायिक रित्या सांभाळल जाऊ लागलं महिला क्रिकेट मधील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्याशी नियमित सामने होऊ लागले नियमित सामने आणि आर्थिक शाश्वती यामुळे महिला अधिक मन लावून खेळू लागल्या नकळत खेळाची गुणवत्ता सुधारली.. 
WPL ची गरज: दरम्यान च्या काळात २००९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडून नियमित टी२० विश्वचषक आयोजित केला जाऊ लागला याकरणाने महिलांना टी२० प्रकारचा अधिक सराव मिळावा म्हणून भारतात IPL च्या धर्तीवर महिलांची IPL सुरू व्हावी म्हणून मागणी जोर धरू लागली..  IPL च्या यशाने आणि IPL चा भारतीय क्रिकेट वर झालेला सकारात्मक परिणाम, तळागळातून सापडलेले नवनवीन खेळाडू आणि छोट्या छोट्या गावातून तयार झालेले टॅलेंट ही IPL ची भारतीय क्रिकेट ला देणगी आहे. तसाच प्रयोग महिला क्रिकेट मध्ये व्हावा, क्रिकेट महिलांना करियर ऑप्शन व्हावा यासाठी WPL चा प्रयोग गरजेचा होता.
हे सगळं घडून येण्यासाठी एक घटना किंवा ट्रिगर पॉईंट गरजेचा होता. तो आला २०१७ च्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात. हरमनप्रित कौर हिने २०१७ च्या त्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनल मध्ये नाबाद १७१ धावांची अविस्मरणीय खेळी केली आणि महिला क्रिकेट भारतात सेंटर स्टेज घेतलं... महिला क्रिकेट अधिक आवडीने पाहिले जाऊ लागले. मीडिया, मार्केट, मनी, सगळ्यांच्या मुखी भारतीय महिला क्रिकेट होते. हीच संधी साधून BCCI ने पहिल्यांदा २०१८ मध्ये प्रायोगिक तत्वावर वूमेन्स टी२० चॅलेंज ही IPL ला लागून प्रदर्शनीय सामना स्वरूपात सुरू केली. 

वूमेन्स टी२० चॅलेंज: भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू दोन संघात अनुक्रमे हरमनप्रित कौर च्या नेतृत्वात  सुपरनोव्हा आणि स्मृती मंधना च्या नेतृत्वात ट्रायलब्लेझर्स  मध्ये विभागल्या गेल्या. आणि एकच सामना २०१८ साली चॅलेंज स्पर्धेसाठी खेळवला गेला. त्यात सुपरनोव्हाज ने सामना जिंकला आणि पहिल्या टी२० चॅलेंज करंडकावर आपले नाव कोरले..
२०१९ मध्ये टी२० चॅलेंज स्पर्धा तीन संघापर्यंत विस्तारली गेली आणि व्हेलोसिटी हा नवीन तिसरा संघ यात सामील झाला दुसऱ्या सिझन मध्ये पुन्हा एकदा सुपरनोव्हाज ने बाजी मारली आणि एक प्रदर्शनीय सामना म्हणून सुरू झालेली टी२० चॅलेंज स्पर्धा आता रीतसर साखळी आणि अंतिम सामना या प्रकारात खेळली गेली. या वुमेन्स टी२० चॅलेंज ची आणखी एक खासियत म्हणजे यात IPL सारखेच परदेशी खेळाडू देखील या संघांचे भाग होते..डिअन्द्रा डॉटिन, सून लस, अलाना किंग, सोफी एक्लस्टन, ली तुहुहू, चमारी अट्टापट्टू, आयबोंगा खाका, डॅनी व्यात, मेगन शूट, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, मेग लॅनीन आदी परदेशी खेळाडूंचा सहभाग होता.. २०२० मध्ये चॅलेंज स्पर्धा कोविड काळात संयुक्त अरब अमिराती मध्ये झाली पुन्हा तिन्ही संघ सुपरनोव्हाज, ट्रायलब्लेझर्स, व्हेलोसिटी लढले आणि २०२० मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा ट्रायलब्लेझर्स ने जिंकली.. २०२१ मध्ये स्पर्धा कोविड च्या कारणास्तव पुढे ढकलली गेली आणि अखेर ती स्पर्धा २०२१ मध्ये झालीच नाही.
२०२२ च्या स्पर्धेच्या वेळी BCCI ने आणखी नियोजनबद्ध काम करून IPL आणि चॅलेंज स्पर्धा एकत्र खेळवण्याचा प्रयोग केला जो यशस्वी झाला. पुरुषांच्या सामन्याधी महिलांचा सामना व्हायचा.. २०२२ च्या मोसमात सुपरनोव्हाज आणि व्हेलोसिटी मध्ये अंतिम सामना झाला आणि त्यात विक्रमी तिसऱ्यांदा सुपरनोव्हाज विजयी ठरले. याच दरम्यान अधिकृत WPL ची चाचपणी सुरू झाली होती आणि सौरव गांगुली यांच्या अध्यक्षते खाली WPL ची पहिली स्पर्धा २०२३ मध्ये IPL च्या साथीने खेळवली जाईल अशी घोषणा झाली..

WPL चा आरंभ: तीन- चार मोसम चॅलेंज स्पर्धा आणि वाढती लोकप्रियता पाहून BCCI ने WPL चा घाट क
घातला अगदी गेली १६ वर्ष यशस्वी IPL संयोजनाचा अनुभव गाठीशी असल्याने WPL देखील IPL च्या पावलावर पाऊल टाकत फ्रांचाईज क्रिकेट मॉडेल वर सुरू झाले. पाच क्रिकेट संघांसाठी बोली लावली गेली त्यात दिल्ली कॅपिटल्स, युपी वॉरीयर्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांनी बोली जिंकल्या आणि हे संघ प्रस्थापित झाले..
टी२० चॅलेंज मधील सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव पद्धतीने संघबांधणी झाली त्यात स्मृती मंधना या भारतीय खेळाडूला ३.४० कोटींची सर्वाधिक बोली रॉयल चॅलेंजर बंगलोर ने लावली आणि तीच संघाची कर्णधार झाली आणखी काही लक्षवेधी बोली मध्ये, हरमनप्रित कौर १.८० कोटी, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रीग्ज यांना युपी वॉरियर्स ने २.८० कोटी ची बोली लावली, परदेशी खेळाडूंमध्ये आश्ले गार्डनर आणि नताली स्कायव्हर ह्या सर्वात महागड्या परदेशी खेळाडू ठरल्या...
WPL चा थरार: पाच संघ एकमेकांशी प्रत्येकी दोन सामने खेळणार असा स्पर्धेची रचना होती. टॉप तीन संघ प्ले ऑफ मध्ये व टॉपर संघ थेट अंतिम सामना खेळेल या नियमात स्पर्धा मुंबई च्या डी. वाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम येथे खेळले गेले. स्पर्धा चांगली च चुरशीची झाली. एकवेळ अशी होती स्पर्धेच्या मध्यात की कोणताही एक संघ प्ले ऑफ साठी पात्र होईल असे खात्री ने सांगता येत नव्हते मात्र दुसऱ्या उत्तरार्धात, मुंबई, दिल्ली आणि युपी यांनी जम बसवला आणि प्ले ऑफ ला पात्र झाले, दिल्ली कॅपिटल्स टेबल टॉपर म्हणून थेट अंतिम फेरीत पोहोचले तर मुंबई आणि युपी मध्ये क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात एलिसा हिली आणि  ताहिली मॅकग्रा यांच्या खेळामुळे युपी वॉरियर्स ने प्रथम बॅटिंग करताना ६ बाद१३८ धावा केल्या.. उत्तरादाखल मुंबई इंडियन्स ने मेग लॅनिन, एलिस कॅप्सी, मॅरिझन कॅप्प यांच्या जोरावर आव्हान सहज पार केले..
२६ मार्च २०२३ रोजी अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी मुंबई च्या ब्रेबोर्न स्टेडियम वर झाला. पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्स ने २० षटकात ९ बाद १३१ धावा केल्या त्यात मेग लेनिन च्या ३५ आणि राधा यादव च्या २७ धावांचा मोठा वाटा होता..
धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स यांनी नताली स्कायव्हर च्या ६० आणि कर्णधार हरमनप्रित कौर च्या ३७ धवांच्या आधारे १३२ धावांचे आव्हान लीलया पार करून पहिल्या WPL च्या विजयी संघ होण्याचा मान मिळवला..
या WPL च्या प्रयोगामुळे भारतातील महिला क्रिकेट अधिक आकर्षक, लक्षवेधी आणि स्पर्धात्मक झाले..

कथा ही क्रिकेट विश्वचषकाची


पूर्वेतिहास

क्रिकेट तस सतराव्या शतकापासून इंग्लंड मध्ये खेळलं जातंय.. पण ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणामुळे क्रिकेट सर्वदूर पसरले.. आजच्या तारखेला १०८ देशात क्रिकेट खेळलं जातं. अश्या या विस्तारलेल्या खेळातली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे क्रिकेट विश्वचषक अर्थात वर्ल्ड कप.. दर चार वर्षांनी भरणारा हा क्रिकेटचा कुंभमेळा नक्की कधी आणि कसा सुरू झाला ते आपण पाहूया..
क्रिकेटची पहिली मॅच आश्चर्य म्हणजे कॅनडा आणि अमेरिका यांच्यात सप्टेंबर १८४४ साली खेळली गेल्याची नोंद आहे. तर पहिली अधिकृत कसोटी सामना १८७७ साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे खेळला गेला.. त्यालाच आज आपण एशेस म्हणतो. कालांतराने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होत गेली दक्षिण आफ्रिका १८८९, वेस्ट इंडिज १९२८, न्यूझीलंड १९३०, भारत १९३२, पाकिस्तान १९५२ अशी संघ वाढत गेले.. दरम्यान १९०० सालच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट चा समावेश झाला आणि आणखी आश्चर्य म्हणजे क्रिकेट चे एकमेव ऑलिम्पिक सुवर्ण फ्रांस कडे आहे. १९६० च्या दशकात क्रिकेट थोडे वेगवान आणि मर्यादित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याची सुरुवात कौंटी क्रिकेट पासून झाली ८ चेंडूंचे अष्टक असलेली ४० ओव्हर चे सामने खेळवले जाऊ लागले.. त्याची लोकप्रियता आणि विविध देशात मर्यादीत ओव्हर्स च्या सामन्यांची लोकप्रियता वाढल्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. १९७१ साली ऑस्ट्रेलिया च्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड वर पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला गेला.. आणि आयसीसी ला वर्ल्ड कप चे डोहाळे लागले...

प्रुडेन्शियल पर्व(१९७५-१९८३):
वर्ल्ड कप आयोजनाचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आयोजक आणि प्रायोजक दोघांची गरज असते. १९७० च्या दशकात इंग्लंड इतका सक्षम आयोजक त्या काळात नव्हता आणि ब्रिटिश इन्श्युरन्स कंपनी प्रुडेन्शियल च्या पुढाकाराने पहिला विश्वचषक इंग्लंड मध्ये १९७५ साली खेळला गेला. 

वेस्ट इंडिज पहिला मानकरी (१९७५)

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, कॅनडा आणि पूर्व आफ्रिका हे आठ संघ पहिला विश्वचषक खेळले.. वर्णद्वेषाची पार्श्वभूमी असलेल्या दक्षिण आफ्रिकेवर क्रीडा जगताने बहिष्कार टाकल्याने दक्षिण आफ्रिका हा विश्वचषक खेळू शकली नाही.भारत श्रीनिवास वेंकटराघवन यांच्या नेतृत्वात पहिली स्पर्धा खेळला. पहिल्या स्पर्धेत भारताने पूर्व आफ्रिका विरुद्ध चा एकमेव सामना जिंकला आणि परतीची वाट धरली. कृष्णामचारी श्रीकांत च्या शब्दात पूर्व आफ्रिका हौशी गुजरात्यांचा संघ होता.. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड,वेस्ट इंडिज यांनी उपांत्य फेरी गाठली.

 पहिल्या वर्ल्ड कप ची पहिली फायनल ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाली, क्लाइव्ह लॉइड कॅब्या वेस्ट इंडिज ने ऑस्ट्रेलिया ला १८ धावांनी हरवून पहिल्या विश्वचषकावर आपले नाव कोरले..

दुबार वेस्ट इंडिज (१९७९):

दुसरी स्पर्धा पुन्हा चार वर्षांनी इंग्लंड मध्ये प्रुडेन्शियल ने प्रायोजित केली होती. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड,वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा हे आठ संघ दोन गटात विभागले गेले १२ गटवार साखळी सामन्यानंतर इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचले अंतिम सामना यावेळी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान झाला. भारत या स्पर्धेत आपले तिन्ही सामने हरला आणि मोकळ्या हाती परतला.. कसोटी न खेळणाऱ्या श्रीलंके कडून भारताला या स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला. 

अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज ने विव रिचर्डस च्या शतकाच्या जोरावर इंग्लंड ला ९२ धावांनी पराभूत करून सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

वेस्ट इंडीज च्या हॅट्ट्रिक ला कपिल्स डेविल्स चा खो (१९८३): 

सलग तिसऱ्यांदा स्पर्धा इंग्लंड मध्ये आयोजित होत असताना प्रुडेन्शियल ट्रॉफी चा ही शेवटची स्पर्धा होती. स्पर्धा सुरू होताना सगळ्यांना जवळपास खात्री होती की वेस्ट इंडिज हॅट्ट्रिक करणार वेगवान गोलंदाजांचा तोफखाना आणि बेदरकार फलंदाजी करणारे फलंदाज यांच्या जोरावर वेस्ट इंडिज कोणालाही लोळवेल अशी सगळ्यांना खात्री होती. स्पर्धा सुरू झाली आणि वेस्ट इंडिज ला पहिला धक्का बसला. मागच्या दोन स्पर्धा हजेरी लावणाऱ्या भारताकडून साखळीतील एका  सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.. भारत आपल्या गटातील इतर संघ ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे यांच्या विरुद्धचे अनुक्रमे एक आणि दोन सामने जिंकून गटात दुसरे राहून उपांत्य फेरीत पोहोचले.. या दरम्यान झिम्बाबवे विरुध च्या एका सामन्यात ५ बाद १७ अशी स्थिती असताना कपिल ने १७५* धावांची खेळी केली जी भारतीय क्रिकेट इतिहासात अजरामर आहे... दुर्दैवाने त्या दिवशी बीबीसी च्या कर्मचाऱ्यांचा संप असल्याने त्या मैदानावर उपस्थित असलेले क्रिकेट रसिक फक्त त्या खेळीचे साक्षीदार आहेत. उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंड शी पडली, कपिल ची बॉलिंग आणि संदीप पाटील मोहिंदर अमरनाथ च्या महत्त्वपूर्ण धावांमुळे भारत अंतिम फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध उतरला.
अंतिम सामन्यात भारताची फलंदाजी फारशी बहरली नाही रडतखडत श्रीकांत, अमरनाथ, संदीप पाटील, मदनलाल, किरमाणी यांनी धावसंख्या १८३ पर्यंत पोहोचवली.. मध्यंतराला संपूर्ण भारत देशाने आशा सोडून दिली होती.. १८३ धावा वेस्ट इंडिज ६० षटकात आरामात करेल म्हणून लोकांनी टीव्ही बंद करून आपल्या कामाला लागले. १८३ चा पाठलाग करताना वेस्ट इंडिज १ बाद ५० अश्या सुस्थितीत होता. नंतर मात्र आधी डेसमंड हेन्स आणि आणखी पाच धावा करून कपिल च्या त्या आश्चर्यकारक कॅच ने सामना बघता बघता भारतच्या पारड्यात वळला होता. भारत आणि इतिहास यांच्यात फक्त एक जण उभा होता वेस्ट इंडिज चा किपर जेफ दुजॉन.. त्याचा अडसर ११९ धावा असताना जिमी अमरनाथ ने दूर केला आणि १८३ धावा आता वेस्ट इंडिज ला अशक्यप्राय वाटू लागल्या अखेर १४३ धावात वेस्ट इंडिज चा डाव संपला आणि क्रिकेट विश्वाला नवा कोरा विश्वविजेता संघ भारत मिळाला..

 हे सारं कल्पनेच्या पलीकडलं होतं.. स्पर्धा सुरू होताना कोणी म्हटलं असतं भारत विश्वचषक जिंकेल तर लोकांनी आणि स्वतः खेळाडूंनी त्याला वेड्यात काढला असता. कोट्यवधी भारतीयांच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणून कपिल लोर्ड्स च्या गॅलरीत विश्वचषक घेऊन उभा होता...

ऑस्ट्रेलिया चा श्रीगणेशा (१९८७): 

आजच्या काळात ५० षटकांचा एकदिवसीय सामना पहिल्यांदा या स्पर्धेपासून सुरू झाला. पहिल्यांदा स्पर्धा इंग्लंड च्या बाहेर आली. आणि प्रुडेन्शियल हे नाव जाऊन ही स्पर्धा रिलायन्स कप म्हणून ओळखली गेली. आठ संघांची दोन गटात विभागणी आणि गटात दुहेरी साखळी अश्या प्रकारात ही स्पर्धा खेळवली गेली.  भारत पाकिस्तान संयुक्त यजमान, जोडीला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाबवे, वेस्ट इंडिज हे आठ संघ सहभागी झाले भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचले लाहोर येथे पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पाकिस्तान ला हरवून अंतिम फेरी गाठली मुंबईत वानखेडे स्टेडियम वर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रॅहम गुच आणि माईक गॅटिंग यांच्या बहारदार फलंदाजी मुळे इंग्लंड ने भारताला ३५ धावांनी पराभूत केले.. अंतिम सामन्यात दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने आले..

 कलकत्त्याच्या इडन गार्डन वर माईक गॅटिंग चा एक रिव्हर्स स्वीप शॉट चुकला आणि इंग्लंड च्या हातातोंडाशी आलेला वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया ने ७ धावांनी जिंकून आपला पहिला विश्वचषक जिंकला..

कॉर्नर्ड टायगर्स ची फिनिक्स भरारी (१९९२): 

ही स्पर्धा सर्वार्थाने नाविन्यपूर्ण होती पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलियन खंडात झाले होते. कॅरी पेकर ची सर्कस सुरू होऊन आता १५ वर्ष झाली होती. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच सहभागी झाली होती. पांढरे कपडे जाऊन रंगीत पोशाख, पांढरा चेंडू, काळा साईट स्क्रीन, दिवस रात्र प्रकारात सामने, आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे गटवार साखळी जाऊन सगळे सहभागी ९ संघ एकमेकांशी एकदा खेळले. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, झिम्बाबवे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे नऊ संघ स्पर्धेत सहभागी झाले. भारतीय संघ महंमद अझरुद्दीन च्या नेतृत्वात सहभागी झाला. या स्पर्धेत काही विलक्षण लक्षात राहणाऱ्या गोष्टी म्हणजे भारत- पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पहिल्यांदा विश्वचषकात आमनेसामने आले. या सामन्यात किरण मोरे - जावेद मियाँदाद च्या माकड उड्या सगळ्यांनी पहिल्या. दुसरीकडे स्पर्धेचा फॉरमॅट पाहता प्रत्येक संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी किमान पाच सामने जिंकणे अत्यावश्यक होते. न्यूझीलंड सर्वाधिक ७ सामने जिंकून अव्वल राहिले तर पाकिस्तानने पहिले तीन सामने गमावल्यानंतर आणि इंग्लंड विरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यावर जोरदार मुसंडी मारत पुढचे सलग सामने जिंकत चौथ्या नंबर वर उपांत्य फेरीत दाखल झाले. न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत खेळले, पदार्पणात उपांत्य फेरी गाठून दक्षिण आफ्रिका ने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. उपांत्य फेरीत पाकिस्तान ने न्यूझीलंड ला लीलया हरवले पण चर्चा झाली ती दुसऱ्या उपांत्य सामन्याची. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातला हा सामना वादग्रस्त "रेन रुल" मुळे चर्चेत राहिला. २५२ धावांचे लक्ष गाठत असताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात पावसाचा व्यत्यय आला आणि  १३ चेंडूत २२ हे समीकरण अचानक १ चेंडूत २२ असे अन्याय कारक ठरले. इंग्लंड ने अंतिम फेरीत सलग दुसऱ्या वेळी प्रवेश केला. समोर इम्रान खान च्या प्रेरणेने उभा राहिलेला आणि एकवेळ स्पर्धेबाहेर जाईल अशी शक्यता असलेला कॉर्नर्ड टायगर्स म्हणून संबोधलेला पाकिस्तान चा संघ.. इम्रान खान- जावेद मियाँदाद च्या भागीदारी मुळे इंग्लंड ला २५० धावांचे लक्ष मिळाले.

 इंग्लंड ची सुरुवात निराशाजनक झाली ४ बाद ६९ अशी स्थिती असताना, अॅलन लॅम्ब आणि फेअरब्रदर ने ७१ धावांची भागीदारी करून इंग्लंड ला सामन्यात जिवंत ठेवले.. अखेर वसीम अक्रम, अकीब जावेद आणि इम्रान खान यांनी इंग्लंड चा डाव गुंडाळला आणि पाकिस्तान पहिल्यांदा विश्वविजेता ठरला..

लंकन लायन्स ची गरुडझेप (१९९६): 

विश्वचषक स्पर्धा ९ वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय उपखंडात आली. भारत पाकिस्तान, श्रीलंका संयुक्त यजमान होते एकूण १२ संघ सहभागी झाले कसोटी खेळणारे ९ देश यांच्या जोडीला केनिया, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड यांनी स्पर्धेत भाग घेतला. १२ संघ दोन गटात विभागले जाऊन प्रत्येक गटातले चार संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणार होते गटसाखळी स्पर्धा पार पडल्यावर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे आठ संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. योगायोगाने भारत- पाकिस्तान पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांशी लढले त्या सामन्यात चिन्नास्वामी मैदानावर अमीर सोहेल- व्यंकटेश प्रसाद यांच्यातील कलगीतुरा आणि अजय जडेजा ने वकार युनूस ला फटकावलेले षटकार चांगलेच गाजले. इतर सामन्यात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आपआपले सामने जिंकून उपांत्य फेरीत दाखल झाले. भारत- श्रीलंका, ऑस्ट्रेलिया- वेस्ट इंडिज अश्या लढती निश्चित झाल्यानंतर सर्व लक्ष ईडन गार्डन्स वर होतं भारत श्रीलंकेविरुद्ध खेळत होता पहिली फलंदाजी करताना अरविंद डिसिल्व्हा, रोशन महानामा,  रणतुंगा यांच्या फटकेबाजी जोरावर श्रीलंका ८ बाद २५१ पर्यंत पोहोचली. धावांचा पाठलाग करताना भारत एकवेळ १ बाद ९८ अश्या सुस्थितीत होता त्यानंतर मात्र जयसूर्या, धर्मसेना, अरविंद डिसिल्व्हा यांच्या फिरकी पुढे भारत ८ बाद १२० अश्या लाजिरवण्या स्थितीत पोहोचला.. विनोद कांबळी चा रडका चेहरा सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला. इडन गार्डन्स चे स्टँड प्रेक्षकांनी पेटवून दिले अखेर सामनाधिकारी क्लाइव्ह लॉइड यांनी सामना श्रीलंकेला बहाल केला.. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ने सुरक्षेच्या कारणास्तव आपला श्रीलंके विरुद्धचा साखळी सामना श्रीलंकेला बहाल केला. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज ने ऑस्ट्रेलिया विरूद्ध चा आपला सामना अखेरच्या काही षटकात ५ धावांनी गमावला. 

अंतिम सामन्यात मार्क टेलर च्या ७४ धावांचा खेळीने ऑस्ट्रेलिया २४१/७ अशी समाधान कारक धावसंख्या उभी करू शकली. अरविंद डिसिल्व्हा ने अंतिम सामन्यात शतक करून श्रीलंकेला पहिल्यांदा विश्वविजेता झाली..

ऑस्ट्रेलियन दादागिरी ची सुरुवात (१९९९):

ही स्पर्धा १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंड मध्ये आली आणि " आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप " या अधिकृत नावाने ओळखली गेली. स्पर्धेत ९ कसोटी खेळणारे देश सोबत केनिया, बांगलादेश, स्कॉटलंड असे बारा देश खेळले. स्पर्धेचा फॉरमॅट थोडा बदलला आधी गट साखळी आणि नंतर सुपर सिक्स अशी मांडणी झाली यात गट साखळीत मिळवलेले विजय अतिशय महत्त्वाचे ठरणार होते. भारत तिसऱ्यांदा अझरुद्दीन च्या नेतृत्वात सहभागी झाला.
गटसाखळीतील एका सामन्यात सचिन तेंडुलकर आपल्या वडिलांच्या निधनानंतर केनिया विरुद्ध खेळला आणि शतक केले.. गटसाखळी तुन भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाबवे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,पाकिस्तान सुपर सिक्स साठी पात्र झाले. भारताने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाबवे दोघांविरुद्ध आपले गटसाखळीतील सामने गमावल्याने अडचणीत होता सुपर सिक्स मध्ये फक्त पाकिस्तान विरुद्ध चा सामना जिंकता आल्याने व ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कडून पराभूत झाल्याने भारताची वाटचाल सुपर सिक्स मध्ये संपली. सुपर सिक्स मध्ये आणखी एक चर्चेतला सामना म्हणजे ऑस्ट्रेलिया- दक्षिण आफ्रिका
या सामन्यामुळे खरतर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचली. एकवेळ अशी होती की ऑस्ट्रेलिया ला सलग सगळे सामने जिंकणे अत्यावश्यक होते त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यापासून झाली.. या सामन्यात हर्शल गिब्ज ने स्टीव्ह वॉ चा सोडलेल्या कॅच चे कवित्व आजही संपलेल नाही..
सुपर सिक्स मधून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आले. पाकिस्तान ने सईद अन्वर च्या शतकाच्या जोरावर आणि भेदक गोलंदाजी च्या जोरावर न्यूझीलंड ला झोपवले.. दुसऱ्या उपांत्य सामन्यात खरा रोमांच होता. ऑस्ट्रेलिया ने पहिली फलंदाजी करताना सर्वबाद २१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला फायनल दिसत होती सुरुवात ही चांगली झाली होती. बिनबाद ४८ धावा असताना शेन वॉर्न १३व्या षटकात बॉलिंग ला आला आणि २१ व्या षटकापर्यँत ४ बाद ६१ अशी दक्षिण आफ्रिकेची अवस्था झाली. पण पॉलोक, कालीस, ऱ्होड्स , क्लुजनर यांनी किल्ला लढवला. अखेरच्या काही षटकात क्लुजनर अक्षरशः ऑस्ट्रेलियन बॉलिंग वर तुटून पडला.. शेवटच्या षटकात अॅलन डोनाल्ड क्लुजनर ने मारलेला बॉल कडे बघत बसला आणि २१३ धावसंख्येवर आफ्रिकेचा डाव संपला.
सुपर सिक्स मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवल्यामुळे सामना टाय होऊन ही ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचली..

अंतिम सामन्यात पाकिस्तान ने ऑस्ट्रेलिया ला १३२ धावांचे माफक आव्हान ठेवले जे ऑस्ट्रेलिया ने ९ विकेट राखून सहज पार केले आणि ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज नंतर दोन विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला..

भारताचे स्वप्नभंग (२००३): 

स्पर्धा पहिल्यांदाच आफ्रिका खंडात आयोजित केली गेली दक्षिण आफ्रिका, केनिया, झिम्बाबवे संयुक्त यजमान होते आणि १० कसोटी खेळणारे संघ सोबत केनिया, नामीबिया, नेदरलँड, कॅनडा असे १४ देश सहभागी झाले गटसाखळी आणि सुपर सिक्स अशी स्पर्धेची रचना होती.. भारत, ऑस्ट्रेलिया, झिम्बाबवे, श्रीलंका, न्यूझीलंड, केनिया सुपर सिक्स साठी पात्र ठरले . स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पासून भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होईल अशी चर्चा होती. भारत सौरव गांगुली च्या नेतृत्वात आणि तरुण खेळाडू घेऊन खेळला..१ मार्च २००३ चा महाशिवरात्री च्या दिवशी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध चा सामना पिढ्यानपिढ्या चर्चिला जाईल.. सचिन च्या ९८ धावा सईद अन्वर च्या शतकावर त्या दिवशी भारी पडले.. सचिन ने अँड्र्यू काडीक ला मारलेला षटकार आणि शोएब आखतर ला मारलेला अप्पर कट स्पर्धेची हायलाईट ठरली.
झिम्बाबवे विरुद्ध जिंकलेला सामना आणि सुपर सिक्स मधील केनिया, न्यूझीलंड, श्रीलंकेविरुद्ध चे विजय भारताला उपांत्य फेरीत घेऊन गेले. या स्पर्धेत न्यूझीलंड ने केनिया वर बहिष्कार टाकल्याने केनिया ला त्याचा फायदा झाला आणि केनिया आश्चर्यकारक रित्या उपांत्य फेरीत दाखल झाला. भारत- केनिया, ऑस्ट्रेलिया- श्रीलंका अशी उपांत्य लढती झाल्या. कर्णधार सौरव गांगुली ने शतक करून भारताला अंतिम सामन्यात नेले. ऑस्ट्रेलिया ने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरी गाठली.

२३ मार्च २००३ ला अंतिम सामन्यात सौरव गांगुली ने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, झहीर खान ची ती पहिली ओव्हर अजूनही झोप उडवते. वाईड बॉल टाकून पहिल्या ओव्हर पासून सामना ऑस्ट्रेलिया च्या बाजूने झुकला. नंतर रिकी पॉंटिंग, डेमियन मार्टिन यांनी शतके करून भारतासमोर ३६० धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युत्तर देताना सचिन पहिल्या ओव्हर मध्ये मॅक्ग्रा कडून बाद झाला, नंतर सेहवाग ची एकाकी लढाई कमी पडली आणि १९८३ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले..

ऑस्ट्रेलिया ची अजेय हॅट्ट्रिक (२००७):

विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच कॅरेबियन बेटावर आयोजित केली गेली या स्पर्धेत बऱ्याच गोष्टी वादग्रस्त ठरल्या. नियोजन, स्पर्धेची रचना, स्पर्धेची लांबी आणि टीव्ही प्रक्षेपणाला अडचणीची ठरणारी रात्री ची वेळ या सगळ्या मुळे ही स्पर्धा सगळ्यात कंटाळवाणी ठरली असे बरेच जाणकार म्हणतात. या स्पर्धेत १० कसोटी संघ या शिवाय स्कॉटलंड, बर्म्युडा, नेदरलँड, आयर्लंड, कॅनडा,केनिया असे तब्बल १६ संघ सहभागी झाले यांची चार गटात विभागणी झाली. प्रत्येक गटातील पहिले  दोन संघ सुपर एट मध्ये खेळले.. गटसाखळीत भारताचा बांगलादेश, श्रीलंका कडून झालेला पराभव आणि पाकिस्तान चा वेस्ट इंडिज, आयर्लंड विरुद्ध झालेला पराभव दोन्ही संघाना स्पर्धेबाहेर घेऊन गेला. पाकिस्तान च्या गच्छंती नंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान चे प्रशिक्षक बॉब वुलमर हॉटेल मध्ये मृतावस्थेत आढळले..गट साखळीतील एका सामन्यात हर्शल गिब्ज ने नेदरलँड च्या डॅन व्हॅन बुंग याला एक षटकात सहा षटकार मारले..
गट साखळीतील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, आयर्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका सुपर एट या टप्प्यासाठी पात्र ठरले.. सुपर एट मध्ये बांगलादेश ने दक्षिण आफ्रिकेला पराभावाचा धक्का दिला..
सुपर एट मधून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, आणि श्रीलंका उपांत्य फेरीत दाखल झाले श्रीलंकेने महेला जयवर्धने च्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंड ला मात दिली, ऑस्ट्रेलिया ने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला सहज हरवले. बार्बाडोस च्या ब्रिजटाऊन मध्ये अंतिम सामना झाला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका मध्ये ही १९९६ ची पुनरावृत्ती होती, मात्र यावेळी ऑस्ट्रेलिया विजयी ठरले..

 पहिल्यांदा फलंदाजी करताना ऍडम गिलख्रिस्ट याने ग्लोव्हज मध्ये स्क्वॅश बॉल घालून धडाकेबाज शतक ठोकले. श्रीलंकेच्या डावात पावसाचा व्यत्यय आला आणि सामना डकवर्थ ल्युईस नियमाने खेळवला गेला.  भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच संपलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने श्रीलंकेला ५३ धावाने हरवून ऑस्ट्रेलिया ने सलग तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आणि हॅट्ट्रिक पूर्ण केली..
ही स्पर्धा जिंकताना १९९९ च्या स्पर्धेपासून ऑस्ट्रेलिया एकही सामना हरली नव्हती...

सचिन ची स्वप्नपूर्ती (२०११):  

सचिनच्या २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कमतरता होती ती एका विश्वचषकाची.. एकीकडे समकालीन पॉंटिंगने तीन, इंझमाम, जययसूर्या  ने प्रत्येकी एक विश्वचषक जिंकला असताना सचिन ची झोळी २२ वर्षांनंतरही रिकामीच होती.. २००७ च्या लाजिरवण्या एग्झिट नंतर सचिन ची ही अखेरची संधी होती ती देखील घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर.. १५ वर्षांनी भारतात विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार होती.. सोबत श्रीलंका बांगलादेश हे सहयजमान होते एकूण संघाची संख्या १४ होती गट साखळी, आणि बाद फेरी अशी स्पर्धेची रचना होती. या विश्वचषकात काही धक्कादायक निकाल लागले इंग्लंड बांगलादेश आणि आयर्लंड कडून पराभूत झाले. दक्षिण आफ्रिकेने भारताला नमवले, पाकिस्तान आपले सर्व गटातील सामने श्रीलंकेत खेळला.. गटसाखळीनंतर ऑस्ट्रेलिया,भारत,न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड बाद फेरीत पोहोचले. भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी अहमदाबाद च्या मोटेरा मैदानावर होता.. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा बॅटिंग करताना पॉंटिंग च्या शतकाने ६ बाद २६० पर्यंत पोहोचली. धावांचा पाठलाग करताना धोनी सहित निम्मा संघ २०० च्या अलीकडेच गडगडला होता.. अखेर युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी सहाव्या विकेट साठी ७४ धावांची अभेद्य भागीदारी करून भारत उपांत्य फेरीत दाखल झाला, इतर सामन्यात पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड यांनी सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली.. पाकिस्तान विरुद्ध च्या उपांत्य सामन्यात सचिन ने महत्त्वपूर्ण ८५ धावा केल्या भारत ९ बाद २६०, वहाब रियाझ ने पाच बळी टिपले होते.. पाकिस्तान ने हाफिज, शफीक, मिसबाह उल हक यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या गोलंदाजी समोर पाकिस्तान २३१ धावात गारद झाला आणि अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नाच्या मध्ये उभी होती फक्त श्रीलंका... 

अंतिम सामना मुंबई च्या वानखेडे मैदानावर खेळला गेला दिवस होता २ एप्रिल २०११ अंतिम सामन्यात दोनदा नाणेफेक झाली कारण प्रेक्षकांच्या आवाजात कर्णधाराचा आवाज एकमेकांना ऐकू गेला नाही.. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी केली महेला जयवर्धने ने अंतिम सामन्यात शतक झळकावले.. आणि श्रीलंका ६ बाद २७४ धावा केल्या.. भारताची फलंदाजी ची सुरुवात चांगली झाली नाही सेहवाग दुसऱ्या बॉल ला बाद झाला काही वेळेने सचिन ही परतला आणि भारतीयांच्या काळजाचे ठोके चुकले.. सचिन बाद झाला तेव्हा धावफलक होता २ बाद ३१ अजून विजय बराच लांब होता.. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गौतम गंभीर ने आधी कोहली मग धोनी ला साथीने घेऊन धावफलक हलता ठेवला.. कोहली, गंभीर बाद झाल्यावर धोनी ने सूत्र आपल्या हाती घेतली आणि युवराज सिंग च्या साथीने षटकार मारून सामना संपवला आणि रवी शास्त्री चे ते शब्द अब्जावधी भारतीयांच्या कानात घुमले.. Dhoni.... finishes off in style, India win the World Cup after 28 years..  गेली २२ वर्ष जे स्वप्न सचिन पाहत होता ते २ एप्रिल २०११ ला पूर्णत्वास गेले.. सामन्यानंतर विराट कोहली ची प्रतिक्रिया बोलकी होती.. ज्या सचिन ने गेली कित्येक वर्षे भारतीयांचे आशा, अपेक्षा आपल्या खांद्यावर उचलल्या त्या सचिन ला खांद्यावर घेण्याची जवाबदारी आमची आहे.. याच स्पर्धेचा मानकरी युवराज सिंग ठरला. तो या स्पर्धेत कॅन्सर ची प्राथमिक लक्षणे दिसत असताना ही खेळत राहिला... ती रात्र भारतीयांच्या मनात अजूनही रुंजी घालते...

ऑस्ट्रेलियाचा "पंच "(२०१५):



विश्वचषक स्पर्धा दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे २३ वर्षानंतर खेळवली गेली यावेळी स्पर्धा २०११ प्रमाणेच गटसाखळी आणि बाद फेरी या रचनेत खेळली गेली.. स्कॉटलंड, आयर्लंड, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान यांचा समावेश असलेले १४ संघ सहभागी झाले.. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पिढी बदलणारी होती.. नव्वदीच्या दशकातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत नव्हते. ऑस्ट्रेलिया चा पॉंटिंग, भारताचे सचिन, सेहवाग, युवराज,झहीर या स्पर्धेत नव्हते.. भारताला नवीन सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या रुपात मिळाले.. गटसाखळीतील सर्व सामने जिंकून भारताने बाद फेरीत प्रवेश केला या स्पर्धेतही इंग्लंड बांगलादेश कडून, वेस्ट इंडिज आयर्लंड कडून, आयर्लंड स्कॉटलंड कडून हरले.. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना लो स्कोरिंग थ्रिलर ठरला..  ऑस्ट्रेलिया च्या १५१ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड ची ९ बाद १४६ अशी अवस्था झाली असताना केन विल्यमसन याने षटकार मारून सामना न्यूझीलंड ला जिंकून दिला.. या स्पर्धेत इतिहासात पहिल्यांदाच दोन द्विशतकी खेळी झाल्या वेस्ट इंडिज च्या ख्रिस गेल ने झिम्बाबवे विरुद्ध २१५ व न्यूझीलंड च्या मार्टिन गपटील ने वेस्ट इंडिज विरुद्ध २३७* धावा केल्या..
भारत बाद फेरीत बांग्लादेश विरुद्ध खेळला, रोहित शर्मा च्या शानदार शतकाने भारत बांगलादेश ला हरवून उपांत्य सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला.. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया ने भारतासमोर ३२९ धावांचे लक्ष ठेवले.  स्टीव्ह स्मिथ ने शतक केले.. भारत पाठलाग करताना केवळ २३३ धावात गारद झाला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले, सामना ओकलंड च्या मैदानावर होता.. सामना रंगात आला असताना मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या ग्रांट एलियट ने शेवटच्या षटकात डेल स्टेन ला षटकार मारला आणि दक्षिण आफ्रिका चौथ्यांदा उपांत्य फेरीतून माघारी गेली..

 ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड शी अंतिम सामना खेळली पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंड ची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मॅक्युलम पहिल्याच ओव्हर मध्ये बाद झाला. ग्रांट एलियट, केन विल्यमसन यांनी धावसंख्या १८३ पर्यंत नेली, मात्र छोट्या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहज केला आणि ७ गडी राखून ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा जगज्जेते झाले..

इंग्लंडच्या मुकुटाला नियमाचा आधार (२०१९):

इंग्लंड या स्पर्धेत खेळण्यापूर्वी १९८७ आणि १९९२ अशी सलग दोन अंतिम सामने हरले होते.. त्यानंतर जवळ जवळ तीन दशक त्यांची एकदिवसीय क्रिकेट संघाची घडी बसूच शकली नाही.. २०११, २०१५ असे सलग दोन स्पर्धेत आयर्लंड बांगलादेश कडून लाजिरवाणे पराभव स्वीकारल्यावर २०१९ ची तयारी इंग्लंड ने २०१५ पासून लगेचच केली वन डे स्पेशालिस्ट खेळाडू कौंटी च्या मैदानातून शोधून शोधून काढले, वन डे ला साजीशी बॉलिंग करू शकणारे गोलंदाज इंग्लंड ने शोधून काढले.. कुक, अँडरसन, ब्रॉड,बेल,ट्रॉट ही कसोटी खेळणारे खेळाडू एकदिवसीय संघातून कायमचे बाद करून नव्या दमाचे रूट, बटलर,बेअरस्टो, बेन स्टोक्स, जेसन रॉय, ऑईन मॉर्गन, असे फटकेबाज फलंदाज, आणि प्लंकेट, आर्चर, वोक्स, राशीद, वूड्स शोधून काढले.. स्पर्धा सुरू होताना सबंध ब्रिटिश वर्तमान पत्रात इंग्लंड च्या विजयाची भाकिते केली जाऊ लागली. गेल्या स्पर्धेतील गटवार साखळी पद्धत जाऊन सहभागी संघाची संख्या कमी करून ती १० वर आणली, या स्पर्धेत झिम्बाबवे, आयर्लंड, नेदरलँड सारखे संघ खेळत नव्हते फक्त अफगाणिस्तान आणि ९ नियमित कसोटी संघ या स्पर्धेत खेळले साखळी स्पर्धा पार पडली. या साखळीत महंमद शमी आणि ट्रेंट बोल्ट यांनी हॅट्ट्रिक घेतली.. उपांत्य फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड दाखल झाले भारत न्यूझीलंड विरुद्ध चा उपांत्य सामना पावसाच्या व्यत्ययामुळे राखीव दिवसावर गेला २३० धावांचे माफक आवाहन भारताला पेलवले नाही आणि न्यूझीलंड सलग दुसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचले.. इंग्लंड ने ख्रिस वोक्स च्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ला ८ गडी राखून पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली..

१४ जुलै २०१९, लोर्ड्स, बाराव्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. दोघांपैकी जो जिंकेल तो पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरणार होता. न्यूझीलंड ने पहिल्यांदा फलंदाजी करताना हेन्री निकोलस, केन विल्यमसन , टॉम लेथम यांच्या बॅटिंग ने २४१ धावा केल्या, इंग्लंड प्रत्युत्तर देताना अडखळत होतं. शेवटच्या दोन ओव्हर मध्ये विजयासाठी इंग्लंड च्या हाती दोनच विकेट शिल्लक राहिल्या बेन स्टोक्स अजूनही फलंदाजी करत होता.. 
शेवटच्या पन्नासाव्या षटकात विजयासाठी १३ धावा पाहिजे होत्या बेन स्टोक्स एक चोरटी धाव घेताना सीमेवरून आलेला एक थ्रो त्याच्या बॅट ला लागून विरुद्ध दिशेला सीमेपार गेला, १३ धावांच्या अचानक ६ धावा झाल्या. स्कोर टाय असताना आधी आदिल रशीद बाद झाला आणि पुढच्या चेंडूवर मार्क वूड. १०० षटकांचा खेळानंतर दोन्ही संघ बरोबरी वर होते , स्पर्धेच्या नियमानुसार पुन्हा एक एक सुपर ओव्हर खेळली गेली.. इंग्लंड ने पहिली सुपर ओव्हर खेळताना १५ धावा केल्या.. न्यूझीलंड च्या सुपर ओव्हर ला जेमी निशम आणि मार्टिन गपटिल आले. निशम ने पाच बॉल मध्ये १३ धावा कुटल्या. शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड ला विजयासाठी दोन धावा हव्या असताना गोलंदाज जोफ्रा आर्चर ने अगदी पायात बॉल टाकला, गपटिल तो बॉल केवळ मिड विकेट पर्यत ढकलू शकला दुसरी धाव घेताना गपटिल धावबाद झाला १०२ ओव्हर खेळून ही इंग्लंड आणि न्यूझीलंड बरोबरी वर.. स्पर्धा नियमात जर सुपर ओव्हर टाय झाली तर बाऊंडरी काऊंट वर सामन्याचा निकाल ठरणार होता तिथे इंग्लंड (२६ - १७)न्यूझीलंड च्या पुढे होत आणि नियमाच्या आधारे इंग्लंड ने विजेतेपदला गवसणी घातली...

चार वर्षांनी क्रिकेटचा हा कुंभमेळा पुन्हा भारतात होत आहे. कोणीतरी जिंकेल कोणीतरी हरेल.. पण या game of glorious uncertainties ने गेल्या बारा स्पर्धांमध्ये अनेक चढउतार दाखवले यंदाची स्पर्धा ही अशीच होवो ही प्रत्येक क्रिकेट प्रेमीची इच्छा असेल..

तूर्तास लेखनसीमा..

- हर्षद मोहन चाफळकर,पुणे
chapharshad@gmail.com

Saturday, August 19, 2023

ग्रहांचा गोचर कालावधी

ग्रहांचा #गोचर कालावधी
#रवि: एका राशीत सुमारे एक महिना
#चंद्र: एक राशीत सुमारे सवा दोन दिवस
#मंगळ: एक राशीत दिड ते पावणेदोन महिने
#बुध: एका राशीत पाऊण महिना
#गुरू: एक राशीत तेरा महिने
#शुक्र: एक राशीत पाऊण महिना
#शनी: एका राशीत अडीच वर्षे
#राहू_केतू: एक राशीत प्रत्येकी दीड वर्ष
#हर्षल: एक राशीत सुमारे सात वर्षे
#नेपचून: एका राशीत सुमारे चौदा वर्षे
#प्लूटो: एका राशीत सुमारे चोवीस वर्ष

Wednesday, August 16, 2023

अटल बिहारी वाजपेयी- अंकशास्त्रीय मागोवा

अटल बिहारी वाजपेयी #अंकशास्त्र

जन्मतारीख: 25/12/1924
#जन्मांक: 7
#प्रारब्ध अंक: 8
 जन्मांक 7 व्यक्तीला भावना शील कल्पक, उदार अंतकरणाची, काहीशी अलिप्त वयक्तिमत्त्व बनवते.
वाजपेयींची अंक कुंडली मांडल्यास 2,5,1,2,4 हे अंक दिसतात

2 अंक तीनदा आलाय कारणाने व्यक्ती अतिशय हळव्या कवी मनाची दिसते.मनस्वी आनंद घेणारे आणि देणारे चंद्र लोकप्रियतेचा कारक असल्याने अटलजी अतिशय लोकप्रिय होते. समजसेवा, राजकारण ह्या आवडत्या क्षेत्रात अटलजी कार्यरत राहिले.

1 अंक त्यांच्यातील नेतृत्व गुण दाखवतो. अधिकारपद मिळवण्यात त्यांना या अंकाचा लाभ झाला. याच अंकाने त्यांना मान सन्मान, प्रतिष्ठा दिली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा सरकार मध्ये असताना उमटवला.

4 अंक राहू हर्षल चा यात त्यांचा कणखरपणा अणूचाचणी सारखा चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेण्याचा धैर्य त्यांनी दाखवले.

अटलजींनी पहिली पंतप्रधान पदाची शपथ 16 मे 1996 रोज घेतली पूर्ण तारखेची बेरीज केली असता ती येते 1 जो  8  चा शत्रू अंक आहे. ते सरकार 13 दिवसात पडले

दुसऱ्या टर्म ची शपथ त्यांनी 19 मार्च 1998 रोजी घेतली संपूर्ण बेरीज 4 हा मित्र अंक येते त्यांनी 13 महिने सरकार चालवले.

तिसऱ्या टर्म ला शपथ त्यांनी 13 ऑक्टोबर1999 ला घेतली. तारीख आणि वर्ष दोन्ही मित्र अंक या कारणाने ते सरकार साडेचार वर्षे चालले.

दुसऱ्या टर्म मध्ये केलेली अणूचाचणी

11 मे 1998 (7) ते 13 मे 1998(9) दोन्ही मित्रांक  असल्याने यशस्वी झाली.
 कारगिल युद्ध 
3 मे 1999 (9) ते 26 जुलै 1999(7) पर्यँत चालले, दोन्ही मित्रांक असल्याने भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देऊन विजय मिळवला.

2004(6) साली अटलजींचा पराभव झाला कारण , वर्ष हे शुक्राच्या अमलाखाली होते जे 7 आणि 8 दोन्ही चे शत्रू अंक आहे.

(सशुल्क मार्गदर्शनासाठी  संपर्क करावा. https://api.whatsapp.com/send?phone=+919765417361)

✒️ Harshad Mohan Chaphalkar

मुलीकडून होकार येईल का?

🌺 ।।#श्रीगुरुदेवदत्त।। 🌺

#कृष्णमूर्तीपद्धती #प्रश्नकुंडली #रुलिंगप्लॅनेट

#प्रश्न: मुलीकडून विवाहासाठी होकार येईल का?

जातक तसा माझ्या लांबच्या ओळखीचा होता.त्याने 9 जुलै 2019ला त्याची आणि मुलीची कुंडली जुळवण्यासाठी पाठवली होती.

दोघांच्या कुंडल्या बघितल्या सप्तम, कुटुंब, भाग्य, महादशा मॅच केल्या. पारंपरिक गुणमेलनात 25 गुण जुळत होते. म्हटलं go ahead त्यानंतरच्या 15-20 दिवसात एकमेकांच्या घरी बघणं झालं. 29 जुलै 2019 ला मुलाने मेसेज केला मुलीकडून होकार येईल का?

प्रश्न बघतानाची वेळ

#दिनांक: 29 जुलै 2019

#वेळ: 18.50

#स्थळ: पुणे

आरपी घेऊया 
L: शनी (व) (1,2,5,7,10,12) लग्नेश व्यायात😢😢❌
LS: रवी (1,2,7,8,12)
S: शनी(व) (1,2,5,7,10,12) व्यायात 😢😢❌
R: चंद्र (1,2,6,7,12) चंद्र स्वराशीत सप्तमात आहे प्रश्न विवाहसंबंधी आहे हे अधोरेखित झाले.♥️
D: बुध (3,6,9,11,12) राहू(3,6,11,12)🤔

सप्तमचा सब: शुक्र (1,2,5,7,10,12)🤔

मुख्य आरपी मधला शनी (व) दोनदा आला म्हणून सोडून दिला.

लग्न नक्षत्रस्वामी रवी 7 बरोबर च 8,12 चा पण कार्येश आहे.😢😢

चंद्र सुद्धा 7 बरोबरच 6,12 चा कार्येश कारणाने परत negative😢😢

बुध सात चा कार्येश नाही.😢😢 पण तो दोन शक्यता दाखवतो.

बुधाच्या राशीत राहू आहे. म्हणून त्याचा विचार केला.  पण  तो 7 चा कार्येश नाही.

थोडा प्रशकुंडलीत 7 चा सब कडे लक्ष गेले तो शुक्र होता😊😊 पण तो 11 चा कार्येश नाही म्हणून बऱ्याच विचारांती त्याला सांगून टाकले 75% नकाराची शक्यता आहे. 25% आशा ठेवायला हरकत नाही(बुध आहे म्हणून).

आणखी एका पद्धतीने उत्तर काढले,
पांडुरंग कोरडे सरांनी सांगितलेली भोपाळ पद्धती

वेळ सायंकाळी 6. 50 ची आहे.
तासात 1 मिळवा ते लग्न स्थान झाले. 6+1= 7 (तूळ लग्न)

मिनिटाला 5 ने भागा 50 ला 5 ने भागून 10 (मकर रास)उत्तर आले ते चन्द्र रास झाली. 

आता या दोन्ही लग्न आणि चंद्र राशीची केंद्र योग होतो म्हणून उत्तर नकारात्मक द्यावे.

आज 16 ऑगस्ट 2019 ला रात्री 9 वाजता फ़ोन आला 
"सर मुलीकडून नकार आला, त्यांना वर्षभर लग्न करायचं नाहीये."

सशुल्क मार्गदर्शनासाठी मेसेंजर मध्ये संपर्क साधावा.

🙏 ।।#श्रीदत्तात्रयर्पणमस्तू।।🙏

Sunday, July 30, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील काही "नावाजलेल्या" मालिका


आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वर्षभर क्रिकेट दौरे सुरू असतात.. एक संघ दुसऱ्या देशात जाऊन कसोटी, वन डे, टी२० मालिका खेळतो.. या मालिका जश्या त्यांच्यातील खेळाच्या दर्जा साठी, आकडेवारी साठी, विक्रमासाठी लक्षात राहतात तश्याच काही मालिका त्यांचा नावामुळे देखील लक्षात राहतात..
अश्याच काही नावाजलेल्या मालिकांचा घेतलेला आढावा..

१. ऍशेस मालिका:
 इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यमध्ये खेळवली जाणारी ही सगळ्यात जुनी आणि शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही मालिका आहे.. दर चार वर्षांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये ही आयोजित केली जाते... आतापर्यंत ७२ ऍशेस मालिका खेळवल्या गेल्या आहेत... ऑस्ट्रेलिया ३४ तर इंग्लंड ३२ मालिका जिंकले आहे...

२. बेनो - कादिर ट्रॉफी: 
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाणारी ही मालिका तशी नव्यानेच नाव धारण केलेली आहे.. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ही मालिका पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया मध्ये दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.. ऑस्ट्रेलिया चे महान लेग स्पिनर रीची बेनो आणि पाकिस्तान चे महान लेग स्पिनर अब्दुल कादीर यांच्या नावाने ही मालिका आयोजित केली जाते..

३. बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी: 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही मालिका खेळवली जाते १९९६ साली पहिली मालिका खेळवली गेली अनेक वर्षे ही मालिका ४ कसोटी सामन्यांची होती ऑस्ट्रेलिया मध्ये २०२४- २५ मध्ये होणारी मालिका पहिल्यांदाच ५ कसोटी सामन्यांची होईल.. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे महान फलंदाज आणि दोन्ही देशांकडून पहिल्यांदा १० हजार कसोटी धावांचा टप्पा पार करणाऱ्या अॅलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर यांचे नाव मालिकेला देण्यात आले आहे...

४. चॅपेल - हॅडली सिरीज: 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या शेजारी देशांमध्ये ही मालीका दर दोन वर्षांनी वन डे प्रकारात खेळवली जाते २००३- ०४ च्या मोसमात या मालिकेची सुरुवात झाली.. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधील दोन दिग्गज क्रिकेट घराणी चॅपेल आणि हॅडली यांच्या नावाने ही मालिका खेळवली जाते.. कालांतराने ही मालिका टी२० प्रकारात ही खेळवली गेली..

५. बेसिल डी ओलिव्हिएरा ट्रॉफी: 
२००४-०५ च्या मोसमात सुरू झालेली ही कसोटी मालिका इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाते. दक्षिण आफ्रिकी वंशाचे इंग्लिश क्रिकेटपटू बेसिल डी ओलिव्हिएरा यांच्या नावाने ही मालिका खेळवली जाते. बेसिल डी ओलिव्हिएरा यांच्या इंग्लंड संघातील समावेशामुळे १९६८-६९ चा इंग्लंड चा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाला होता. दक्षिण आफ्रिकेने ओलिव्हिएरा यांच्या समावेशाबद्दल आक्षेप घेतले होते. पुढे दक्षिण आफ्रिकेवर वर्णद्वेषाच्या कारणास्तव बंदी आली होती..

६. पतौडी ट्रॉफी: 
 भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंड मध्ये होणारी कसोटी मालिका पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जाते.. २००७ साली भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ही ट्रॉफी सुरू करण्यात आली. भारताचे सुपुत्र इफ्टीकार अली पतौडी यांच्या समरणार्थ ही ट्रॉफी दिली जाते.. 

७. अँथनी डी मेलो ट्रॉफी: 
 भारत आणि इंग्लड यांच्यात भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेस अँथनी डी मेलो ट्रॉफी असे म्हणतात.. अँथनी डी मेलो हे क्रिकेट प्रशासक आणि भारताचे वेगवान गोलंदाज होते.. १९५१-५२ मध्ये या मालिकेस सुरुवात झाली...

८.फ्रॅंक वोरेल ट्रॉफी: 
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ही कसोटी मालिका खेळली जाते, वेस्ट इंडिज चे महान अष्टपैलू  फ्रॅंक वोरेल यांच्या नावाने ही मालिका खेळवतात.. फ्रॅंक वोरेल हे थ्री W's (फ्रॅंक वोरेल, सर एव्हर्टन वीक्स,क्लाइड वॉलकोट) पैकी एक लोकप्रिय नाव...

९. फ्रीडम ट्रॉफी:
  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला फ्रीडम ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. आधी ही मालिका गांधी- मंडेला ट्रॉफी अशी ओळखली जाणार होती मात्र २०१५ साली फ्रीडम ट्रॉफी असे अधिकृत नाव देणात आले.. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना ही ट्रॉफी समर्पित आहे...

१०. विस्डेन ट्रॉफी: 
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला विसडेन ट्रॉफी नाव देण्यात आले. १९६३ साली विसडेन च्या १०० व्या अंकाचे औचित्य साधून ही मालिका सुरू करण्यात आली.. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज  मध्ये ही मालिका दर चार वर्षांनी खेळवली जाते...

११. ट्रान्स टासमन ट्रॉफी: 
टासमन समुद्राच्या दोन्ही बाजूला असलेल्या ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला ट्रान्स टासमन ट्रॉफी असे नाव दिले गेले आहे.. ही मालिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये खेळली जाते. दर चार वर्षांनी ही मालिका खेळवली जाते. 

१२. वॉर्न- मुरलीधरन ट्रॉफी: 
२००८ साली सुरू झालेली ही मालिका श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दर चार वर्षांनी खेळली जाते. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचे महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आणि मुथैय्या मुरलीधरन यांच्या नावाने ही मालिका खेळतात...

१३. विव रिचर्ड्स ट्रॉफी: 
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात ही मालिका खेळवतात.. १९९८ साली सुरू झालेली ही मालिका दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दर चार वर्षांनी खेळतात.. वेस्ट इंडिज चे महान आक्रमक फलंदाज सर व्हीव रिचर्ड्स यांच्या नावाने ही मालिका खेळवतात..

 - हर्षद मोहन चाफळकर, पुणे

Friday, June 30, 2023

२००५: एशेस चं प्लॅटिनम स्टँडर्ड


उद्या शुक्रवार 16 जून 2023 पासून या सहस्त्रकातील इंग्लंड मधली सहावी एशेस मालिका सुरू होईल. कसोटी इतिहासातील सर्वात जुनी किंवा आद्य म्हटली तरी चालेल अशी एशेस ची ख्याती आहे. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दर दोन वर्षांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळवली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया च्या खेळाडूंना सर्वात प्रतिष्ठेची कुठली मालिका असेल तर ती एशेस आहे.. अशीच एक मालिका इंग्लंड मध्ये २००५ साली खेळली गेली होती.. त्या संबंधी च्या आठवणी नव्या एशेस च्या पूर्वसंध्येला जागवूया...


पार्श्वभूमी: २००५ चा ऑस्ट्रेलियन संघ हा तत्कालीन क्रिकेट चा अनभिषिक्त सम्राट होता.. त्या संघात अकरा खेळाडू नव्हे तर अकरा मॅच विनर खेळायचे.. प्रत्येक जण आपल्या दिवशी एक हाती मॅच जिंकवायचा. या संघाने स्टीव्ह वॉ ने ठरवलेले भारतीय भूमीवरचे फायनल फ्रँटियर नुकतंच ऑक्टोबर २००४ मध्ये काबीज केलं होतं. समोर येईल त्या संघाला नामोहरम करायचं हा एक कलमी कार्यक्रम या संघाने राबवला होता... स्टीव्ह वॉ कडून कसोटीची सुत्र रिकी पॉंटिंग कडे आली होती. हेडन, लँगर, पॉंटिंग, क्लार्क, मार्टिन, गिलख्रिस्ट, कासप्रॉव्हिच, वॉर्न, ब्रेट ली, माकग्रा, गिलेसपी हे अकरा जण सहज मॅच जिंकायचे.. कधी कॅटीच अधून मधून खेळायचा..
इंग्लंड दुसऱ्या बाजूला उर्जितावस्था गाठत होती.. हुसेन,  रामप्रकाश, आलेक स्टुअर्ट, कॅडिक ही पिढी जाऊन आता कमान मायकल वॉन कडे आली होती..
सायमन जोन्स, मॅथ्यू होगार्ड, स्टीव्ह हार्मीसन, फ्लिन्टऑफ यांच्या जोडीला एकटा आश्ले जाईल्स स्पिनर... इंग्लंड ची बॅटिंग मुख्यत्वे करून ट्रेसकोथिक, स्ट्रोस, इयन बेल, मायकल वॉन, पिटरसन, फ्लिन्टऑफ यांच्यावर होती..

लोर्ड्स ची शरणागती:  मालिकेतील पहिला सामना सुरू झाला क्रिकेटची पंढरी लोर्ड्स वर.. इंग्लंड च्या माध्यमांनी ऑस्ट्रेलिया वर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.. पण पहिल्या दिवशी चहापानानंतर इंग्लंड चा पहिला डाव आटोपला आणि ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून पलटवार केला..
पहिल्याच दिवशी माकग्रा ने कसोटीत ५०० बळी पूर्ण केले आणि संपूर्ण मालिकेत आपलेच वर्चस्व राहील याची नोंद इंग्लंड ला घ्यायला लावली..

एजबस्टन पुराण: सध्याच्या काळात एकही कसोटी क्रिकेट प्रेमी नसेल ज्याला एजबस्टन २००५ म्हटलं की अंगावर काटे येणार नाहीत.. सामनाच तसा झाला होता.. कसोटीच्या नाणेफेकी आधी माकग्रा दुखापती मुळे बाहेर झाला आणि ऑस्ट्रेलिया ची बॉलिंग काहीशी कमकुवत झाली.. त्याचा फायदा घेत इंग्लंड ने पहिल्या डावात 407 धावा केल्या ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 99 धावांनी पिछाडी वर पडला आणि इंग्लंड च्या दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लंड चा संघ ब्रेट ली (४ बळी)आणि शेन वॉर्न (६ बळी) ने वाटून खाल्ला.. सामना इथे संपत नाही.कसोटी क्रिकेटची खरी झिंग इथून सुरू होते.. चौथ्या दिवसाच्या चहापाना आधी ऑस्ट्रेलिया चा दुसरा डाव सूरु होतो.. विजयासाठी २८२ धावा हव्या असतात.. उपलब्ध वेळ, फलंदाजी ची खोली पाहून सगळ्यांना खात्री असते की ऑस्ट्रेलिया ही मॅच सहज जिंकणार.. चहापाना नंतर नाट्यमय घडामोडी घडतात.. हेडन, लँगर,  पॉंटिंग, मार्टिन, गिलख्रिस्ट एका पाठोपाठ एक बाद होत जातात.. दिवसाची शेवटची ओव्हर टाकायला हारमिसन आलेला असतो स्ट्राईक ला मायकेल क्लार्क.. नॉन स्ट्राईक ला शेन वॉर्न.. हारमिसन च्या हातून अलगद बॉल सुटतो क्लार्क चकतो.. आणि बोल अलगद जाऊन स्टंप वर आदळतो... संपूर्ण इंग्लंड जल्लोष करत असतं.. कारण त्यांना माहीत होतं की उद्या फक्त शेवटचे फलंदाज बाद केले की मालिकेत बरोबरी साधता येईल आणि १७-१८ वर्षांनी घरच्या मैदानावर एशेस मालिका जिंकण्याचं स्वप्न जीवंत राहील.. रात्र सरते आता फक्त शेन वॉर्न, ब्रेट ली, कासप्रॉव्हिच राहिले...
शेवटचा दिवसाचा खेळ सूरु होतो.. ब्रेट ली आणि शेन वॉर्न खिंड लढवत राहतात.. वॉर्न कधी नव्हे ते त्वेषाने खेळत दिसेल तो बॉल मारत सुटतो.. हा त्याचा जुगार ऑस्ट्रेलिया विजया पासून १२ धावा दूर असताना संपतो.. कासप्रॉव्हिच ब्रेट ली ला साथ द्यायला येतो.. ब्रेट ली दोन खणखणीत चौकार मारतो विजय ४ धावा दूर असतो.. पुढच्या ओव्हर ला स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी ब्रेट ली एक धाव घेतो आणि कासप्रॉव्हिच स्ट्राईक ला येतो.. विजय ३ धावा दूर.. स्टीव्ह हार्मीसन चा  पुन्हा एक उसळता बॉल कासप्रॉव्हिच च्या खांद्याकडे जातो.. बॉल ग्लोव्हज ची किनार घेऊन किपर गेरायन्त जोन्स च्या ग्लोव्हज मध्ये विसावतो आणि पाच दिवस सूरु असलेली तुंबळ लढाई अखेर दोन धावांचा अंतराने इंग्लंड च्या पदरी पडते.. It's coming home चा जल्लोष सुरू होतो.. आणि मालिका ओल्ड ट्राफर्ड कडे सरकते..

ओल्ड ट्राफर्ड ची समेट: एजबस्टन च्या झिंगातून ना इंग्लंड सावरलेले असते ना क्रिकेट प्रेमी तो ज्वर ती नशा अजूनही लोकांच्या डोक्यात असते.. मँचेस्टर च्या ओल्ड ट्राफर्ड वर हाय स्कोरिंग ड्रॉ खेळला जातो.. मायकेल वॉन, अँड्र्यू स्ट्रोस, रिकी पॉंटिंग शतके करतात.. मॅच ड्रॉ होते... मालिका ट्रेंटब्रिज ला पोहोचते..

ट्रेंटब्रिज ची आघाडी: एजबस्टन चा विजय, ओल्ड ट्राफर्ड ची समेट झाल्यानंतर शेवटच्या दोन कसोटीत आघाडी कोण घेणार यासाठी ट्रेंटब्रिज ची कसोटी महत्त्वाची ठरणार होती.. पहिल्या डावात इंग्लंड ४४४, ऑस्ट्रेलिया २१८. मायकेल वॉन ने ऑस्ट्रेलिया ला फॉलो ऑन दिला.. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया ३८७ धावा करते आणि इंग्लंड ला शेवटच्या डावात मालिकेत आघाडी घेण्यासाठी हव्या असतात फक्त १२९ धावा.. ऑस्ट्रेलिया त्या १२९ धावातील प्रत्येक धाव मिळवणे कठीण करते.. शेवटच्या दिवसाच्या खेळपट्टीवर शेन वॉर्न खेळणे केवळ अशक्य होतो...
३२ धावा असताना वॉर्न ट्रेसकोथिक ला माघारी धाडतो.. ३६ ला वॉन, ५७ ला , ५७ ला इयन बेल.. ३२/० वरून ५७/४ इंग्लंड च्या छाताडत धडकी भरते.. समोर ती एशेस ची कुपी दिसत असते पण हाताला अजून लागत नाही.. केविन पिटरसन ५७ चा स्कोर १०३ पर्यंत नेतो आणि ब्रेट ली ची शिकार होतो.. फ्लिन्टऑफ चा अडसर ब्रेट ली दूर करतो इंग्लंड साठी अजूनही विजय १८ धावा दूर असतो.. गेरायन्त जोन्स एक दोन फटके मारून अंतर कमी करतो असाच एक फटका मारताना तो वॉर्न च्या आमिषाला बळी पडतो.. विजय अजूनही १२ धावा दूर.. मैदानात आता फक्त जाईल्स आणि होगार्ड..
ब्रेट ली च्या पायात स्प्रिंग असल्यासारखा तो धावत सुटतो एक बॉल त्याच्या कडून फुल टॉस सुटतो होगार्ड नावाला जोरात येणाऱ्या बॉल ला मध्ये बॅट घालून दिशा देतो आणि बॉल गॅप मधून सीमेपार.. दुसरा बॉल पुन्हा ब्रेट ली भरकटतो.. लेग साईड वरून बॉल सीमे कडे जातो.. जिंकण्यासाठी आता फक्त ४ धावा पाहिजे असतात.. स्ट्राईक ला जाईल्स.. वॉर्न बॉलिंग करत असताना त्या ओव्हर मध्ये जाईल्स दोन चकतो.. दुसऱ्या वेळी कॅमेरा गॅलरीत बसलेल्या मायकल वॉन कडे जातो.. त्याच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात.. इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड वेळोवेळी ४ धावा दाखवत राहतो.. शेन वॉर्न च्या ओव्हर चा शेवटचा बॉल फुल टॉस जातो.. जाईल्स ऑन साईड ला बॉल ढकलत विजयला गवसणी घालतो.. सबंध इंग्लंड जल्लोषात नहातं.. दशकानंतर इंग्लंड ने एशेस मालिकेत पहिल्यांदाच आघाडी घेतली असते...
 आता एशेस वाचवायचा म्हणजे ऑस्ट्रेलिया ला ओव्हल वर विजय अनिवार्य असतो...

ओव्हल ची औपचारिकता: चार सामन्यात घमासान तुंबळ लढाई झाल्यानंतर मालिका ओव्हल वर पोहोचते.. दोन्ही संघांचे उद्दिष्ट स्पष्ट असतात.. ऑस्ट्रेलिया ला जिंकायचंच आहे.. इंग्लंड ला अनिर्णित राहणे पुरेसे आहे.. इंग्लंड ३७३, ३३५ ऑस्ट्रेलिया ३६७, ४/० मालिका जिंकण्याची संधी समोर दिसत असताना दुसऱ्या डावात केविन पीटरसन ऑस्ट्रेलिया वर तुटून पडतो.. शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात इंग्लंड चा डाव संपून हेडन- लँगर ही जोडी खेळायला येऊन ४/० असताना दोन्ही संघात हस्तांदोलन होते आणि सामना अनिर्णित राहतो आणि इंग्लंड चे एशेस जिंकण्याचे स्वप्न साकार होते... It's coming home चं आता It has come home.. होतं.. हा विजय इंग्लंड जवळ जवळ महिनाभर साजरा करत  राहतं...
ऑस्ट्रेलिया मात्र वाट पाहत असते ती २००६/०७ च्या एशेस मालिकेची...

 हर्षद मोहन चाफळकर, पुणे

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला